e-peek pahani: नमस्कार शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्र राज्य हे कृषीप्रधान राज्य म्हणून ओळखले जाते राज्यातील जवळपास निम्मी लोख सख्या हि शेती वर अवलंबून आहे आणि आपण जर पहिले तर आपल्या या देशा मध्ये सर्वात जास्त शेती केली जाते. त्यामुळे शेतकरी हा देशाचा कणा म्हणून देखील ओळखला जातो आणि सद्याची परिस्थती पाहता शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी राज्य सरकार तसेच केंद्र सरकार नव नवीन योजना ह्या आणत आहेत. त्यामध्ये राज्य शासनाची सर्वात महत्त्वकांक्षी योजना हि जाहीर केली आहे, या मध्ये शेतकऱ्यांना मात्र 1 रुपया भरून पिक विमा हा दिलेला आहे.
राज्यातील शेतकऱ्यांच्या आर्थिक सुरक्षेसाठी पिक विमा हा एक महत्वाचा आहे. शेतकरी बांधवांनी पिक विमा हा किमी कृषी क्षेत्रात नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करण्याच्या दृष्टीने, महाराष्ट्र सरकारने ई-पीक पाहणी (E-Pik Pahani) नावाचा उपक्रम सुरू केला आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांची नोंदणी ऑनलाइन करण्याची सोय मिळते. शेतकऱ्यांना त्यांच्या मोबाईलवरून आणि इंटरनेटच्या सहाय्याने त्यांच्या पिकांची पेरणीची माहिती अचूकपणे नोंदवता येते, ज्यामुळे नंतर कोणत्याही प्रकारच्या नुकसान किंवा विमा दाव्यांच्या प्रक्रियेत सुलभता येते.
ई-पीक पाहणीचा मुख्य उद्देश म्हणजे शेतकऱ्यांना आपल्या पिकांच्या नुकसानाची भरपाई वेळेवर मिळवून देणे. शेतकऱ्यांना नुकसान झाल्यास, त्यांचा दावा लवकर निकाली काढण्याची प्रक्रिया सुलभ होईल. यासाठी शेतकऱ्यांचा सहभाग महत्त्वाचा आहे, कारण यामुळे पिकांच्या नोंदी अचूक होतात आणि सरकारी योजनांचा लाभ शेतकऱ्यांपर्यंत सहज पोहोचवता येतो.
ई-पीक पाहणीचा उपयोग:
पेरणी नोंदणी: शेतकऱ्यांना पिकांची नोंदणी ऑनलाईन स्वरूपात करण्याची सोय मिळते. त्यामुळे शेतकऱ्यांना वेळ वाचतो आणि प्रक्रिया अधिक पारदर्शक होते.
नुकसानीची भरपाई: नैसर्गिक आपत्तींमुळे पिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना तत्काळ योग्य प्रकारे मदत मिळू शकते. यामुळे त्यांना आर्थिक दृष्टिकोनातून मदत मिळते.
विमा आणि दावे: शेतकऱ्यांना पीक विमा घेण्यास मदत मिळते. यासाठी पिकांच्या नोंदीची अचूकता सुनिश्चित केली जाते, जेणेकरून दावे सुलभपणे निकाली काढता येतात.
I have money for emergency
Epik wima farm pls attachments